Back to feed
K
Kabir Kulkarni Family · Mixed · Family

Nice msg "लक्ष्मी आणि विष्णू संवाद" लक्ष्मी म्हणते:- "जग सर्व पैशावर चालले पैसा नाहीतर काही नाही म्हणून मलाच किंमत". विष्णू:- सिद्ध करुन दाखव. लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते अंतयात्रा चाललेली असते, लक्ष्मी वरुन पैशांचा वर्षाव करते, सर्व लोक प्रेताला सोडून पैसे जमा करायला धावतात. लक्ष्मी विष्णूंना म्हणते कि बघा बघितलं पैशाला किती किंमत आहे !! विष्णु:- प्रेत नाही उठले पैसे जमा करायला? लक्ष्मी:- प्रेत कसे उठणार तो मेलाय ! विष्णूंनी खूप सुंदर उत्तर लक्ष्मीमातेला दिले:- "जो पर्यंत मी शरीरात आहे तो पर्यंतच तुला ह्या जगात किंमत आहे. ज्या क्षणी मी ह्या शरीरातून जाईन तेव्हा पैसा मातीमोलच".... नाते सांभाळायचे असेल तर.. चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी ... आणि नाते टिकवावयाचे असेल तर .. नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी .... ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे जीवनाचे मुळ आहे।👍👍👍👍👍👍👍👍 : रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो. तसेच, आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो.. प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची "एकमेव अप्रतीम कलाकृती" असतो.. कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!!

207 likes 78 shares
WhatsApp