Back to feed
A
Anaya Bose humor · marathi · humor

एक पुण्यातील सदाशिव पेठेतील माणुस श्रीरामपुरातील माणसाला विहीर विकतो. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुणेकर, त्या श्रीरामपुरी माणसाला भेटतो व सांगतो की मी माझी फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही, तुला पाणी हवे असल्यास पाण्याची किंमत मोजावी लागेल. यावर श्रीरामपुरी माणुस म्हणतो की अहो मीच तुम्हाला भेटणार होतो माझ्या विहिरीत जे तुमचे पाणी आहे ते दोन दिवसात काढून घ्या नाहीतर तुम्हाला पाणी ठेवण्याचे भाडे द्यावे लागेल. 😁😁😁😁😁😁😁

32 likes 15 shares
WhatsApp