Back to feed
N
Navya Rao friendship · marathi · friendship

काल रात्री मुंबईच्या एका मित्राचा फोन आला होता कामासंदर्भात बोलणे झाल्यावर विषय साहजिकच निवडणुकीवर आला , मी विचारले "कोण येईल रे मुंबईत ??" यावर तो उत्तरला, "शिवसेना वाटतं.. पण ह्या वेळी भाजपला खुप चान्सेस आहेत. कांग्रेसला दुर्लक्षून चालणार नाही जबरदस्त तयारी आहे. मनसेबद्दल लोकांना मनातून ओलावा आहे त्यामुळे तेही मुसंडी मारू शकतात. पवार साहेब सगळे गणिते खोटी ठरवत पुढे जातील बुवा निघून. आणि अपक्ष तर सगळीकडे स्पर्धेत आहेतच " मी चक्रावलेल्या डोक्याने एवढंच म्हणालो, "तू पुण्याला स्थायिक केव्हा झालास रे ?" 😂😂😂😂😂😂

212 likes 23 shares
WhatsApp