⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले ...??* – बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले, – पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला, – साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला, – स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले; – महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले, – योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला, – आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला; – सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था… अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या. – महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली; – राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला. – तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला. या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात! हे इतकच नाहीतर बरेच आहे ..... सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. प्रत्येक मना-मनाला आजही स्फूर्ती देते... -------------------------------- ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
S
Shaurya Kulkarni
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
171 likes
65 shares