*ओढ म्हणजे काय?* हे जीव लावल्याशिवाय कळत नाही... *प्रेम म्हणजे काय?* हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही... *विरह म्हणजे काय?* हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही... *जिंकण म्हणजे काय?* हे हरल्याशिवाय कळत नाही... *दुःख म्हणजे काय?* हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही... *सुख म्हणजे काय?* हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही... *समाधान म्हणजे काय?* हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही... *मैत्री म्हणजे काय?* हे ती केल्याशिवाय कळत नाही... *आपली माणस कोण?* हे संकटांशिवाय कळत नाही... *सत्य म्हणजे काय?* हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही... *उत्तर म्हणजे काय?* हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही... *जबाबदारी म्हणजे काय?* हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही... *काळ म्हणजे काय?* हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही... ✌🎭✌ मला माणसे जोडायला आवडतात, माणसांशी नाती जोडायला आवडतात. जोडलेली नाती जपायला आवडतात, कारण माझा विश्वास आहे की, माझ्यानंतर मी कमावलेली संपत्ती मी बरोबर घेऊन जाणार नाही. परंतु, मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी आयुष्यातील खरी कमाई असेल... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
A
Atharv Reddy
Friendship · Marathi · Friendship
73 likes
52 shares