Back to feed
S
Sara Verma Rain · Marathi · Rain

कवी श्री सुरेश भटांची एक सुंदर कविता... विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही..... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही...ll छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजुन अशी भिंत नाही .. माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही.. रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर.. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही ..............!

5 likes 55 shares
WhatsApp