Back to feed
A
Atharv Kumar Friendship · Marathi · Friendship

गवळ्याने दुधात पाणी घातलं होतं, ते दूध माईनं चुलीवर ठेवलं होतं. इकडे पातेल्यात मात्र निराळीच कहाणी होती, दूध आणि पाण्याची मैत्री झाली होती. पातेल्याची गर्मी वाढू लागली, तशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली. हे पाहून दूध दु:खी झाला, त्याने पाण्याला अटकाव केला. सायीचा थर त्याने दिला ठेवून, पाणी बिचारं त्यात बसलं अडकून. इच्छा असताना त्याला दुधात राहता येईना, सायीच्या भिंतीने बाहेर जाता येईना. शेवटी कंटाळून दुधाला म्हणालं पाणी, "जाऊ दे मला नाही तर नष्ट होऊ आपण दोन्ही. " पाण्याचे शब्द ऐकून दूध त्याला म्हणाला, "मरणाची भीती नाही आपल्या मैत्रीला. " पाण्याने दुधाला खुप समजावलं, पण दुधाने त्याचं एक नाही ऐकलं. शेवटी दोघांनी एक निश्चय केला, आणि त्यांना वेगळं करणारा जो अग्नी होता; त्यालाच त्यांनी नष्ट केला.

210 likes 25 shares
WhatsApp