*ताजे पाणी*.......... 🤓 .... *शिळे पाणी* ..........😳 मित्रहो !! ..... जेव्हा *पालिकेचे पाणी* येते, तेव्हा साहजिकच अगोदर बरेचसे *साठवलेले पाणी* शिल्लक असते. मग *ताजे पाणी आले म्हणून हे शिल्लक राहिलेले पाणी ओतून टाकण्यात येते.* 🤥 प्रत्येक घरातले थोडे थोडे मिळून *हजारो लिटर पाणी वाया जाते.* 🙄 केवळ एका चुकीच्या समजूतीने, ’ *ताजे पाणी* वस्तुत: ज्या ठिकाणी *धरणातून पाणीपुरवठा* होतो, तो *मागच्या वर्षी जो पाऊस पडलेला असतो.* त्या पावसाच्या साठवलेल्या पाण्यातून होतो. म्हणजे, जे पाणी आपण *’ताजे’* म्हणून कौतुकाने पितो, ते साधारणत: ८-९ महिने आधीचे असते. केवळ आपल्या घरी पालिकेद्वारे त्या दिवशी ते येत असते. आपण शहरातील सोसायटीच्या लोकांनी खालील गोष्टींचे पालन केले, तर ’ताजे पाणी’ ह्या चुकीच्या समजूतीमुळे होणारी पाण्याची ही नासाडी सहज टाळू शकतो. १. *जरुरीपुरतेच पाणी साठवून ठेवावे.* म्हणजे अतिरिक्त न वापरलेले पाणी ओतून टाकण्याचा प्रश्नच येणार नाही. २. ताजे पाणी आणि शिळे पाणी ह्या कल्पनांना *तिलांजली द्यावी.* ३. वरील मुद्दे चटकन अंगवळणी पडत नसतील, तर तोवर हे *राहिलेले पाणी ओतून न देता,* इतर *घरगुती गरजांसाठी वापरावे.* *’जल है, तो कल है’* 😳😁 नक्की विचार करा ..... .........
61 likes
1 shares