बोलावं म्हटलं कोणाला मन स्थिर नाही माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही साचावी म्हटलं आशा फळ मिळेल काही ठेचाळती जखमा वेदना सहन होत नाही शोधावं म्हटलं स्वप्नांचं क्षितिज खऱ्या स्वप्नांचा भास ही होत नाही द्यावं म्हटलं सुख नावाचे आंदण जडावले मन सुख मानायला तयार होत नाही सांगावं म्हटलं मनातलं सारं पण ऐकायला कोणी तयार होत नाही घे म्हटलं विश्वास समजून विश्वास रुजायला तयार होत नाही सांग म्हटलं प्रतिमेला तुझ्या मनातलं सारं ती सारे निमूट सहन करूनही व्यक्त होत नाही रेखावं म्हटलं चित्र मनचक्षूवर तुझं अपराधी मन रंग भरायला तयार होत नाही मनाला म्हटलं बस कर आता नको अंत पाहू वेडे मन आशा सोडायला तयार होत नाही जावे म्हटलं स्मृतींच्या वाटेने अन हळूच थांबावे वेळ गेली आता हार स्वीकारायला मन तयार होत नाही
254 likes
33 shares