Back to feed
K
Kiara Iyer Life · Marathi · Life

मनाच्या भिंती समोरच्याने कसे वागावे हे आपण का ठरवतो? बहुतेक ते आपण ठरवायला जातो म्हणून त्रास होतो समोरच्याच्या वेगळ्या वागण्याचा. समोरचा स्वतःच्या स्वभावानुसारच वागणार. त्याच्या परिस्थितीनुसारच वागणार. मग आपण अलिप्त व्हावं का? की आहे तसा स्वीकार करावा? स्विकार परिस्थितीचा करता येईल. पण माणूस कसं स्विकारणार? समोरच्याचं दुर्लक्ष पण स्वीकारायचं? मनाच्या भिंती विटांच्या नसतात म्ह्णूनच बहुतेक जगता येतं.

120 likes 73 shares
WhatsApp