मुली लग्न करताना 1. मुलगा नोकरीत आहे का..? 2. हजारो रुपये पगार आहे का? 3. रहायला प्लॅट आहे का? 4. कार आहे का? 5. बॅक बॅलन्स किती आहे? 6. मुलगा एकुलता एक आहे का? ह्या गोष्टी सर्रास विचारतात. पण त्या कधीही हा विचार करत नाहीत की, स्वत:चा बाप 20 - 25 वर्ष शहरात राहुन एक झोपडं खरेदी करू शकला नाही, कधी शेअर रिक्षाने स्टेशनला गेला नाही. अजुन भाड्याच्या खोलीत राहतो. मग हा काल आलेला किंवा नुकताच नोकरीला लागलेला मुलगा लगेच एवढ्या सगळ्या अपेक्षा कसा पुर्ण करु शकतो...? नाही ना करू शकत.... स्वत: कधी साधा वडापाव वर खर्च केला नाही आणि मुलांची लायकी ठरवायला निघाल्या, खरच सुखी संसार मिळवायचा असेल तर मुलगा स्वभावाचने कसा आहे हे पहा नाही तर जे मिळतय ते पण गमावण्याची वेळ येते. कितीही बरी परिस्थिती असली मुलाची तरी मुलीला ते कमी लायिकीच वाटते आणि उगाच आपल्या सासरला कमी लेखतात. खरच ज्याच्याशी लग्न करायचय त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्या चांगल्या वाईटात त्याला साथ करा. तो पैसे कमावण्याची मशिन नाही की तुमच्या बरोबर काम ठेवून सतत फिरायला अबांनीचा पोरगा नाही, "खरच एक दिवस तो तुमच्या स्वत:च्या हिंमतीवर कमीत कमी 60% तरी अपेक्षा नक्की पुर्ण करेल. तुम्ही पण खुश रहाल आणि तो पण.... उगाच अती अपेक्षा करणे चुकिचच..... या पोस्टचा बर्याच मुलीन्ना राग येईल. पण काही बाबी यातील नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत ते नक्की. राग मानू नका...
247 likes
74 shares