या वर्षी देशात मान्सून पाउस दर वर्षी पेक्षा ३% ने कमी राजस्थान वर मेहरबानी तर केरळ वर सगळ्यात जास्त औदासीन्य पुणे, ५ ऑक्टोबर या वर्षी चांगल्या मान्सून च्या चर्चेनंतर आता पर्यंत जे आकडे समोर आलेत त्यानुसार जून ते सप्टेम्बर २०१६ पर्यंत पूर्ण भारत देशात मान्सून पाउस सरासरीपेक्षा ३% नि कमी झाला. तरीही हि काही खूप कमी मानली जात नाही. परंतु, काही प्रदेशांमध्ये या वर्षी सुद्धा मान्सूनचा पाउस कमीच पडला. मजेदार गोष्ट हि आहे कि कमी पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या राजस्थान मध्ये या वर्षी सामान्य पेक्षा २६% अधिक पाउस झाला. जिथे राजस्थान वर मान्सून ने मेहेरबानी दाखवली तर तिकडे केरळ मध्ये या वेळी सामान्य पेक्षा सर्वाधिक ३७% कमी पावसाची नोंद केली गेली. या वर्षी परतीचा मान्सून सामान्य पेक्षा १५ दिवस उशिराने पश्चिम राजस्थान मधून सुरु झाला आहे. भारतीय मौसम विभागाकडून आलेल्या आकड्यांनुसार २७ सप्टेम्बर ला परतीचा पाउस जम्मू-कश्मीर, पश्चिम पंजाब, पश्चिम हरियाणा आणि राजस्थान च्या उत्तर भागांमध्ये पसरला होता जो की आज पर्यंत तिथेच आहे. वर्तमान स्थितीमध्ये विरोधी चक्रवर्ती अभिसरण केंद्रीय पाकिस्तान वर विकसित होत आहे आणि वायव्य भारतातून मान्सून परतीसाठी अनुकूल परिस्थिती बनत आहे. वर्षाऋतुचा प्रभाव कोणत्या राज्यात कसा होता ? हवामान खात्याकडून प्राप्त आकडेवारीनुसार , जून २०१६ ते सप्टेंबर २०१६ कालावधीत , अरुणाचल प्रदेशात पाऊस ३ % कमी व आसाम आणि मेघालय मध्ये ३२ % कमी झाला , सिक्कीम सरासरी पेक्षा २ % कमी पण पश्चिम बंगालमध्ये सरासरी इतकाच झाला। झारखंडमध्ये सरासरीपेक्षा १ % अधिक , बिहारमध्ये ३ % कमी , उत्तरप्रदेशात १५ % कमी ,उत्तराखंड मध्ये १० % कमी हरियाणा व दिल्लीत १० % कमी , पंजाब २८ % कमी तसेच हिमालय प्रदेशात सरासरी पेक्षा २४ % कमी पाऊसाची नोंद झाली त्याच प्रमाणे जम्मू व काश्मीरमध्ये सरासरी पेक्षा १० % कमी तर राजस्थानात सरासरी पेक्षा २६ % जास्त पाऊसाची नोंद झाली। ओरिसात सरासरी पेक्षा ११ % कमी , मध्यप्रदेशात १९ % अधिक , गुजराथ मध्ये १८ % कमी , महाराष्ट्रात १६ % अधिक, छत्तीसगड मध्ये १ % अधिक , आंध्रप्रदेशात ७ % अधिक , तेलंगणात २० % अधिक तामिलनाडु आणि पॉन्डिचेरित २० % कमी , कर्नाटकात १८ % कमी तसेच केरळ मध्ये सरासरी पेक्षा ३४ % कमी पाऊसाची नोंद झाली।
212 likes
7 shares