Back to feed
D
Dhruv Kulkarni Patriotic · Marathi · Patriotic

वॉस्सपवर हे प्रश्न फिरत आहेत. त्याची उत्तरे देत आहोत. 1) भारतात 33 करोड देव आणि लाखो बुवा बापु आहे मग भारत गरीब का आहे? उत्तर : कारण संविधान धर्मनिरपेक्ष आहे. 2) गणपती आणि सरस्वती विद्येची देवता आहे मग भारतात निरक्षरता का आहे? उत्तर : कारण शिक्षणात आरक्षण आहे. 3) भारतात ज्योतिष भविष्य सांगतात मग भुकंप, पुर, दहशतवादी हल्ले होतात मग ह्या ज्योतिषांना हे का नाही समजत? उत्तर : कोण म्हणतं समजत नाही ! *4) उपवास करुन मनोकामना पुर्ण होतात मग भारतात करोडो लोक उपाशी आहेत ज्यांना दोन वेळेच जेवण मिळत नाही मग त्यांना देव का प्रसन्न होत नाही? उत्तर : उपवास करणे व उपासमार होणे यात फरक आहे. 5) नवस करुन जर मुल होत असतील तर नवरा करायची गरज काय असे संत तुकाराम का म्हणतात? उत्तर : कारण मन्नत मागण्याच्या इस्लामी पद्धतीच्या ते विरोधात असावेत. 6) तिर्थक्षेत्री दगड धोंडा पाणी असे संत तुकाराम का म्हणतात? उत्तर : कारण तीर्थक्षेत्रातही दगड धोंडा पाणी वापरून हॉटेलं बांधतील व देव गायब होईल तसेच नद्या डोंगरांच्या तीर्थक्षेत्रातील दहड धोंडा पाणी यावर कलियुगात राजनेता डोळा ठेवतील हे त्यांना माहित होते. 7) देव दर्शन करुन आल्यावर वाटेत गाडीला अपघात होऊन भक्त मरतात देवाच्या मंदीरात चेंगराचेगरी होऊन लोक मरतात मग देव त्यांना का वाचवित नाही? उत्तर : देवान "माम् एकं शरणम् व्रज" म्हणजे "या" म्हणून सांग्तले होते, जा थोडेच म्हटले होते ! जाण्याचे रिस्क ज्याने त्याचे घ्यावे. 8) देव चोरीला जात नाही फक्त दानपेट्या चोरीला जातात असे का? उत्तर : हे उत्तर चोर व मंदिर ट्रस्टी जास्त छान देऊ शकतील. 9) मराठा, ओबीसी, एससी, एसटी लोकांच्या अंगात देव येतो मग ब्राम्हणाच्या अंगात देव का नाही येत? उत्तर : मराठा ओबीसींचे आंगात देव येतो ब्राह्मणांच्या नाही, कारण जो भूदेवच आहे त्यात आणखी देव काय आणायचा ? तुम्ही आम्ही आमिताभ बच्चन सारखे नटू शकतो, आमिताभ बच्चन थोडेच अमिताभ बच्चन सारखा नटतो ?! 10) देव आजार बरा करतो मग डाँक्टराकडे आपण का जातो? उत्तर : देव औषधांत बसून आजार बरा करतो, ते औषध डॉक्टराकडून "विकत" घेतले कि त्याचेही घर चालते म्हणून. 11) देव आहे मग चोरी, बलात्कार, खुण का होतात? उत्तर : कारण यांपासून संरक्षणाची जबाबदारी गृहखात्याने घेतली आहे. 12) सर्व 33 कोटी देवांनी भारतातच का जन्म घेतला? इतर देशात का नाही? उत्तर : कारण सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा. 13) देवांना पोलिस संरक्षण का असते? देव स्वताच रक्षण का करु शकत नाही? उत्तर : करू शकतो पण मग पोलिसांना काम काय द्यायचे ? 14) नवस करुन नोकरी मिळत असते मग अभ्यास करायची मेहनत करायची गरजच काय? उत्तर : नोकरीसाठीही नवस करतात ?! पहिल्यांदाच ऐकलं. कोणी हे खूळ काढलं ? 15) तिर्थक्षेत्रात भ्रष्टाचार केला जातो मग देव त्यांना शिक्षा का देत नाही? उत्तर : देवाच्या न्यायालयात जाऊन पहा. व्यवस्थित शिक्षा होत असते. 16) देव सर्व काही देतो मग काम करायची गरज काय? उत्तर : सर्व काही सरकार देते पण आरक्षणाचा फॉर्म भरण्या इतकी तर मेहनत करावीच लागते ना, तसंय ते ! 17) देवाच्या मंदीरा बाहेर भिकारयांची रांग का? उत्तर : कारण संविधानावर चालणारे सरकार त्यांचे हित करत नाही म्हणून बिचार्यांचा शेवटचा आसरा मंदिरच ठरतो.

184 likes 7 shares
WhatsApp