Back to feed
S
Shaurya Kapoor Life · Marathi · Life

शब्द बदलला की अर्थ बदलतो ... गरीब माणुस दारु पितो. मध्यमवर्गीय मद्यपान करतो.. तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात...! काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते. काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळते.. तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते...! गरीब माणुस करतो ते लफडं. मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम.. तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर...! शब्दा बरोबर शब्द मांडला की कविता होते. शब्दाने शब्द वाढला की भांडण होते.. शब्दाने शब्द वाढत गेले की लेखकाची रॉयल्टी वाढते...! आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं स्वप्न फरारीच बघायच का ? अपना बजाज मधे सुख शाेधायचं...! डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे का ? संस्कार जाेपासून सुसंस्कृत व्हायचे...! आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची का ? त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा...! आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा का ? विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा...! मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची का ? निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे...! जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं का ? एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं...! आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे टेस्ट केलं तरी वितळतं...! वेस्ट केलं तरी वितळतं...! म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका...! वेस्ट तर ते तसंही होतच आहे...! पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत रहा...! कारण गरिबांच्या घरावर लिहलेल असतं सुस्वागतम्...! आणि श्रीमंतांच्या घरावर लिहलेल असतं कुत्र्यांपासुन सावधान...! टेन्शन घ्यायचंच नाही... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...काही कमी पडत नाही...आणि फरक तर अजिबात पडत नाही... कारण, नशीब कधी ही बदलु शकते.... "जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..." 💐हा जन्म पुन्हा नाही 💐

193 likes 87 shares
WhatsApp