"आयुष्य " या शब्दांतच सार काही आलं ना. मिञ - मैत्रीणी हेच आयुष्य होत माझ. छान चाल होत माझ, माञ एका वळणावर ती व्यक्ती भेटली ,आणि जगच बदल माझ कुठे तरी एकट राहणार मन कोणात तरी गुंतु लागले , कळत होत माञ कळुन घेता आले नाही.. पूर्वी पासून ती व्यक्ती मला आवडत होती, मिञमैञीणीण सोबत असताणा सुध्दा मी हरवलेली असाची, ते लपून पाहण, हळूच त्याला बघून हसणं, त्याच्या सोबत राहणं, हळूहळू हे सर्व स्वप्नच बनून राहत का असे वाटू लागले होते, कधी तरी माझ मन त्याला कळेल का असे वाटू लागले, एके दिवशी त्याला मनातल सांगायचे असे ठरवले, माञ मला उशीर झाला होता, ते दृश्य पाहून मी गळुन पडले. कारण त्याच्या आयुष्यात आधिच कोणी तरी होत, ते दृश्य पाहिल्यावर माझ मन रडु लागलं, पहिल्यांदाच कोणावर तरी इतका जीव लावला होता, त्या नंतर त्या वाटेवर नाही जायचे अस ठरवलं, कुठे तरी दूर निघून जावस वाटू लागले, पण मनाने उत्तर दिले ज्याला कोणी नसतो ना त्याला फक्त मिञमैञीणीच असतात.....!!!!!!!! माझी वाट मी बदली आहे, आता फक्त मैञीची वाट !!!!!!!!!
0 likes
0 shares