♥ एक हृदयस्पर्शी प्रेमकथा.. ♥ शालीनी आणि महादेव यांचं चार वर्षाँपासुन एकमेकांवर खुप प्रेम आहे... ते एकमेकांना चांगल्याप्रकारे समजुन घेतात... त्यांच्या प्रेमाबद्दल महादेवच्या घरच्यांनाही माहीती आहे,त्यांची या लग्नाला संमती तर आहे,पण, महादेवच्या वडीलांना शालीनी फारशी पसंत नाही.... महादेवच्या वडीलांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे,एक दिवस घरात कोणीही नसताना, महादेवच्या वडीलांना हार्ट अटॅकचा जोराचा झटका आला.... सुदैवानेत्यावेळी शालीनी तिथे पोहोचली,त्याच्या वडीलांची ही अवस्था पाहुन ती ही थोडी बिथरली.... तिने लगेच महादेवला फोन केला आणि वडीलांच्या अवस्थेबद्दल सांगु लागली पण,त्याचे वडील जोरजोरात ओरडु लागले,त्याच ओरडण्याने घाबरुन शालीनीच्या हातचा मोबाईल खाली पडला... शालीनीचं बोलणं बंद झाल्याने वडीलांच्या अशा अवस्थेमुळे इकडे महादेवला काळजीलागली होती,तो तडख घरी निघाला.... जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्यांच्या वडीलांचा अंत झाला होता,सर्व शेजारी,आई आणि शालीनीही तेथेच होती.... महादेव वडीलांच्या शोकात पुर्णपणे बुडून गेला,काही वेळानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.... काही दिवसांनंतर शालीनीचं महादेवला भेटणं पुर्णपणे कमी झालं होतं... तिचा त्याच्याविषयीचा दृष्टीकोन बदलुलागला होता,आणि एक दिवस ती त्याच्याकडे आली आणि म्हणाली,मी आता इथुन पुढे तुला भेटु नाही शकणार,आणि तु ही मला भेटण्याचा प्रयत्न करु नकोस... माझं दुसर्या एका मुलावर प्रेम बसलंय,आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत,by...! शालीनी हे बोलताना तिच्या डोळ्यात वेगळ्याच प्रकारचे भाव होते महादेवला हे कळतंच नव्हतं की ती असं का बोलतीये पण तिच्या या बोलण्याने त्याचं हिरवंगार जग मात्र उजाडलं गेलं होतं.... असं अचानक चार वर्षाचे नातेसंबंध तोडले गेल्यामुळे तो खुपच दुखावला गेला होता,तिच्या जाणार्या त्या पाठमोर्या सावलीकडे तो भरलेल्या डोळ्यांनी एकटक बघतच राहील होता... ♥ काही दिवसांनी तो शालीनीचा तिरस्कार करु लागला,तिच्या सगळ्या भेटवस्तु तो जाळु लागला,तिला मनापासुन विसरण्याचा प्रयत्न करु लागला,तिला आठवणींतुन पुसु लागला,आणि एक दिवस खरंच शालीनीच्या आठवणींना त्याने मनाच्या एका कोपर्यात दफनकेलं. तो स्वतःच्या कामात बिझी झाला.... छोट्या छोट्या गोष्टीँमध्ये समाधान शोधु लागला..... सहा महीन्यांनंतर महादेव असाच आपल्या मोबाईलशी छेडछाडकरत बसला होता.... आता तो एक यशस्वी बिझनसमन होता,मोबाईलमध्ये असणारे जुनेच call recordings ऐकत बसला होता.... तेवढ्यात त्याला शालीनीच्या एका कॉलचं recording मिळालं.... ♥ ते त्याच्या वडीलांच्या मृत्युवेळच्या कॉलचं होतं,ते त्याने व्यवस्थित ऐकल्यावर त्याला एक जबरदस्त धक्काच बसला,कारण ज्यावेळी शालीनीच्या हातुन तिचा फोन खाली पडला होता त्यावेळि तो चालुच होता,आणि तो कॉल रेकॉर्ड झाला होता,त्यामध्येस्पष्ट ऐकु येत होतं की महादेवच्या वडीलांनी त्यांचा शेवटचा श्वास सोडतेवेळी शालीनीकडुन महादेवपासुन दुर जायचं वचन घेतलं होतं... ♥ हे ऐकताच त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली... तो आहे त्या जागेवरुनखाडकन उभा झाला आणि शालीनीच्या घरी गेला.... घराला कुलुप होतं..... ♥ शेजारुन जाणार्या पादचार्याला त्याने याविषयी विचारलं,त्या पादचार्याने सांगितलं की,अहो तिने तर याच घरातसहा महीन्यांपुर्वीच गळफास लावुन आत्महत्या केली.... ♥ पोलीसांनाही तिच्या आत्महत्येचं कारण कळलं नाही,पण कदाचित तिने जीवनाला कंटाळुन आत्महत्या केली असावी.... ♥ हे ऐकताच महादेवचं दुःख उराशी दाटलं,या बोलण्याने तर त्याचं आभाळच लुटलं,चार दिवस प्रेमाचे गायले,पण तिनेच मृत्युला गाठलं,, खरंच तिने दिलेल्या त्यागाला परीसीमा नव्हती याची जाणीव महादेवलाझाली आणि, महादेव तिच्या आठवणीत,तिच्या दाराशी अश्रु ढाळतबसला आणि जोरजोरात रडु लागला....... ♥
0 likes
0 shares