Back to feed
R
Rohan Malhotra Love · Marathi · Life

मागून कधी प्रेम मिळत नसते ना बळजबरीने ते घेता देता येते त्याचे कोंब मनामनात लागतात रुजवावे तेव्हा हे इवलेसे रोपटे खरे तर मनात तगते आणि नकळत कोणी मनमंदिरात विराजते ना तोडु म्हणता तुटतात हे चिवट धागे ना जोडू म्हणता जुळतात हे बंध रेशमाचे नकळत कशी ही रेशीम गाठ बसते ना लागू पडतात त्यासाठी नियम व्यवहारीजगताचे आपल्या नकळत आपले जगणे हवेहवेसे वाटते ह्या परिमळाने जीवन गंधीत होते..!!

0 likes 0 shares
WhatsApp