Back to feed
K
Kunal Mishra Love · Marathi · Romantic

माणसे येती माणसे जाती. टिकवून ठेवावी ती फक्त नाती. कुणी हसवती कुणी रडवती. तरी हक्काने मित्र म्हणवती. प्रेम घ्यावे प्रेम द्यावे. सगळ्यांनाच आपलेसे करावे. लागले कधी जरी भांडावे. तरी विषय प्रेमाने मांडावे.. एकदाच जीवन हे मिळते. हवे तितके मन जोडावे. कधी हसावे कधी रूसावे. रंग हे ही चाखून पहावे. हीच तर मजा खरी मैत्रीची. म्हणूनच मैत्री मध्ये हृदय मात्र सदा शुद्ध ठेवावे...................

0 likes 0 shares
WhatsApp