मुली सोडून जाताना किती सहजच म्हणून जातात ना........ माझ्या पेक्षा तुला चांगली आणि सुंदर मुलगी मिळेल, मला विसरून जा, माझा विचार करायचा सोडून दे, आपल्या आठवणी सगळ्या पुसून टाक, माझा आई-वडिलांना खूप त्रास होत आहे ” पण तिने असा कधी विचार केलेला असतो का,??? त्या मुलाला आज पर्यंत तिच्या पेक्षा चांगली आणि सुंदर मुलगी दुसरी कोणीच वाटलेली नसते , म्हणून तर तिच्यावर तो इतक जीवापाड प्रेम करत असतो. ज्या मुलगी साठी त्याने स्वतःच्या आयुष्यात दुखं घेऊन तिला सुख देण्याचा प्रयत्न करत असतो तो तिला कसा विसरू शकेल,? ज्या मुलाने त्या मुलीच्या पलीकडे कधीच कोणाचा विचार केलेला नसतो , तो मुलगा तिचा विचार करायच कस सोडून देऊ शकतो. ज्या मुलाने दिवस- रात्र तिचा विचार करून, कष्ट करून, रक्ताचं पाणी करून तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस कसा अविस्मरणीय जाईल, तिच्या चेहऱ्यावर हास्य कसे येईल, आणि तिचा आठवणीत तो दिवस कसा राहील यासाठी तो दिवस- रात्र मरत असतो आणि आज त्याच आठवणींना ती विसरून जा म्हणत आहे. इतक सोप नसत ग ते. त्या मुलाने स्वताच्या आई- वडिलांचा विचार न करता, स्वतच्या आई-वडिलांना त्रास देऊन ,त्यांचाशी खोटं बोलून आई- वडिलांच्या स्वप्नांचा विचार न करता, तुझ्या स्वप्नांचा विचार केला, तुझ्या आई- वडिलांचा आदर केला त्यावेळी तुला स्वतच्या आई- वडिलांना होणारा त्रास दिसतो ग, ... पण त्या मुलाच्या आयुष्याची काळजी करत रात्रभर डोळ्यात पाणी घेऊन न झोपणारे त्याच्या आई-वडिलांचा त्रास तुला कधी दिसला नाही ग
0 likes
0 shares