Back to feed
D
Dhruv Bhat Love · Marathi · Romantic

हसली की फसली असं मुलं समजतात, येथेच मुलींसमोर ते खुळे ठरतात, ते मुलींचं मन आहे हे ते विसरतात, उगीच मनास वेड लावून नभी उंच उडतात, पण तेच बिच्चारे अन वेडे ठरतात, जेव्हा मुली त्यांना मित्र आहे सांगतात, मुलीच हल्ली मुलांना मस्त उल्लू बनवतात, एकावेळी कितीजणांना वेडी आशा लावतात, मुले नुसतेच मुलींना स्वप्नात घेऊन फिरतात, म्हणूनच मुली अभ्यासात मुलांच्या पुढे असतात, मुलांनी मुलींच्या मागे नुस्तच धावायचं नसतं, तीच मन ओळखल्याशिवाय प्रेमात पडायचं नसतं, प्रेमात पडलं तरी करियर बघायचं असत, कारण त्यामुळेच तर जीवन सुंदर होणार असत........

0 likes 0 shares
WhatsApp